Solutions-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ : इतिहासाची साधने-Maharashtra Board

इतिहासाची साधने

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ 

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . () दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

() भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे आहे.

() पुणे

() नवी दिल्ली

() कोलकता

() हैदराबाद

उत्तर :

(ब) नवी दिल्ली

() दृक् -श्राव्य साधनांमध्ये .......... या साधनाचा समावेश होतो.

() वृत्तपत्र

() दूरदर्शन

() आकाशवाणी

() नियतकालिके

उत्तर :

(ब) दूरदर्शन

() भौतिक साधनांमध्ये .......... चा समावेश होत नाही.

() नाणी

() अलंकार

() इमारती

() म्हणी

उत्तर :

(ड) म्हणी

() पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

व्यक्ती विशेष
जाल कूपर टपाल तिकिट अभ्यासक
कुसुमाग्रज कवी
अण्णा भाऊ साठे लोकशाहीर
अमर शेख चित्र संग्राहक
उत्तर :

अमर शेख- चित्र संग्राहक

प्रश्न . टीपा लिहा.

() लिखित साधने

उत्तर :

'लिखित साधने' हे इतिहासलेखनाचे अत्यंत विश्वसनीय असे साधन आहे.

  • लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, कोशवाङ्मय अशा छापील साहित्याचा समावेश होतो.
  • रोजनिशी, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे इत्यादी हाती लेखन केलेले साहित्यही लिखित साधनातच मोडते.

या साधनांच्या आधारे समाजजीवन, चळवळी, प्रशासन, सांस्कृतिक व सामाजिक बाबींचा अभ्यास करता येतो.

() प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

उत्तर :

  • देशभरातील वृत्तपत्रांना जगभरातील बातम्या पुरवण्याचे काम पीटीआय, यूएनआय, समाचार भारती व हिंदुस्थान समाचार या संस्था करतात.
  • जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाकडून मिळतात.
  • पीटीआय ही वृत्तसंस्था १९५३ पासून वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील माहिती वृत्तपत्रांना देत आली आहे. १९९०च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे बातम्या देशभर पाठवायला सुरुवात केली आहे.
  • पीटीआय ही वृत्तसंस्था सरकारी असून या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्या अधिकृत आणि विश्वसनीय मानल्या जातात. म्हणूनच हा मजकूर इतिहासलेखनासाठी महत्त्वाचा व उपयुक्त असतो.

प्रश्न . पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

उत्तर :

  • भारत हा वैविध्याने नटलेला देश असून टपाल खात्याने हे वैविध्य आपल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून साकारलेले दिसून येते.
  • भारत स्वतंत्र झाल्यापासून टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयीची माहिती आपणांस सांगत आली आहेत.
  • विविध नेत्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या, ऐतिहासिक घटनांचे रौप्य ते शतकोत्सव अशा प्रसंगांवर टपाल तिकिटे काढली गेली आहेत.
  • प्राणी, पक्षी, फुले असा निसर्ग, देशातील विविध सण-महोत्सव, महत्त्वपूर्ण संस्थांच्या स्मृती इत्यादींविषयीची तिकिटे टपाल खात्याने काढलेली आहेत.
  • अशा रितीने टपाल खाते आपल्या तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा, इतिहासाचा मौल्यवान वारसा आणि एकात्मता यांचे जतन करण्याचा प्रयत्न करते.

() आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक् -श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.

उत्तर :

  • दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल (इंटरनेट), माहितीपट अशा दृक्-श्राव्य साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते.
  • राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात.
  • वृत्तपट व अनुबोधपट यांमुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो व तो इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतो.
  • म्हणून आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात.

PDF of this Chapter

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ : इतिहासाची साधने - नोट्स

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-१ : इतिहासाची साधने - स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *