Solutions-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने-Maharashtra Board

भारतापुढील अंतर्गत आव्हाने

महाराष्ट्र बोर्ड-इयत्ता नववी- इतिहास-पाठ-३

स्वाध्याय प्रश्नोत्तरे

प्रश्न . पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

() ‘आनंदपूर साहिबया ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या ?

उत्तर :

१९७३ मध्ये आनंदपूर साहिब येथे झालेल्या अधिवेशनात शिरोमणी अकाली दलाने 'आनंदपूर साहिब ठराव' मंजूर केला. या ठरावात पंजाबच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांसाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये

  • चंदीगढ पंजाबला देणे,
  • पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत,
  • शिखांना सैन्यात अधिक प्रतिनिधित्व देणे
  • पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी.

इत्यादींचा समावेश होता.

() जमातवाद नष्ट करण्या साठी काय केले पाहिजे ?

उत्तर :

जमातवाद (सामूहिकतेवर आधारित विभाजन – उदा. धर्म, जात, भाषा, प्रांत यांच्या आधारे सामाजिक तेढ) हे लोकशाही आणि सामाजिक एकतेसाठी एक मोठे संकट आहे. जमातवाद नष्ट करण्यासाठी प्रत्येक पातळीवर – वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय – प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी,

  • विविध धर्म, जातीतील लोकांनी सामूहिक कार्यक्रम, सण, संवादाचे मंच यांतून सहभागी झाले पाहिजे.
  • एकमेकांच्या चालीरिती, सद्विचार एकमेकांनी स्वीकारले पाहिजेत.
  • परस्परांबद्दल आदरभाव बाळगला पाहिजे.
  • एकमेकांच्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नांकडे तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे.
  • त्यासाठी आपल्या धर्माचा अतिरेकी अभिमान सोडायला हवा.

"जमातवादाची मुळे समाजाच्या मनात असतात, ती मनातूनच उपटली पाहिजेत." तिच्यासाठी शिक्षण, संवाद, सहिष्णुता, आणि जबाबदार नागरिकत्व अत्यावश्यक आहे.

() प्रदेशवाद केव्हा बळावतो ?

उत्तर :

प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे. हा बळावतो जेव्हा:

  • विकासातील असमतोल असतो, म्हणजे काही प्रदेश वेगाने प्रगती करतात तर काही मागे राहतात.
  • दारिद्र्य, बेरोजगारी, मागासलेपण.
  • स्थानिक परंपरा आणि संस्कृतीचा अनाठायी गौरव केला जातो, ज्यामुळे इतर प्रदेशांपेक्षा वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो.
  • प्रांताभिमान विकृत स्वरूप घेतो आणि "माझा प्रदेशच श्रेष्ठ" अशी भावना निर्माण होते.
  • राजकीय आणि सामाजिक कारणांमुळे विशिष्ट प्रदेशाला अधिक महत्त्व दिले जाते, ज्यामुळे इतर प्रदेशांमध्ये असंतोष निर्माण होतो.

हे घटक प्रदेशवादाला चालना देतात आणि देशाच्या एकात्मतेला तडा जाऊ शकतो.

प्रश्न . टीपा लिहा.

() जमातवाद

उत्तर :

  • 'जमातवाद' म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय.
  • जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो; तेव्हा त्याचे दुरभिमानात रूपांतर होते.
  • समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात.
  • संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो.

परिणाम :

  • राष्ट्रीय हिताचा विसर पडतो.
  • परधर्मीय शत्रू लेखले जाऊन त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी कलुषित होते. सामाजिक ऐक्य नष्ट होते.
  • न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठीही लोक एकत्र येत नाहीत.
  • छोट्याशा कारणाने दंगली होऊन जीवित व वित्तहानी होते

() प्रदेशवाद

उत्तर :

  • आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे म्हणजे 'प्रदेशवाद' होय.
  • विकासातील असमतोलातून प्रदेशवादाला खतपाणी घातले जाते.
  • आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती श्रेष्ठ असल्याने आपली प्रगती झाली, असा श्रेष्ठत्वाचा गंड प्रगत राज्यांत निर्माण होतो.
  • हे लोक अविकसित राज्यांतील लोकांना कमी लेखून, आपल्या विकासाच्या लाभात त्यांना सहभागी करून घ्यायला तयार होत नाहीत.
  • याउलंट प्रादेशिक अस्मिता जागवून अविकसित भागातील लोक संघटित होतात.
  • स्थानिक परंपरा, संस्कृती यांचा नको तेवढा गौरव करून आपले वेगळेपण ते सिद्ध करीत राहतात. यांतून प्रगत आणि अप्रगत राज्यांत प्रदेशवाद बळावतो.

प्रश्न . पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

() ‘ऑपरेशन ब्लू स्टारकरावे लागले.

उत्तर :

  • १९८० मध्ये पंजाबमध्ये 'स्वतंत्र खलिस्तान' चळवळ सुरू झाली.
  • जर्नेलसिंग भिंद्रानवाले हा कट्टर खलिस्तानवादी व त्याचे अनुयायी सशस्त्र दहशतवादी कारवाया करीत होते.
  • सुवर्णमंदिर परिसरातील अकाल तख्त येथे आश्रय घेतलेल्या भिंद्रानवाले याने सुवर्णमंदिराचा ताबा घेऊन दहशतवादी कारवाया सुरू केल्या.
  • सुवर्णमंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली.
  • या दहशतवाद्यांना सुवर्णमंदिरातून बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला 'ऑपरेशन ब्लू स्टार' करावे लागले.
  • या कारवाईत भिंद्रानवालेसह अनेक दहशतवादी मारले गेले.
  • या कारवाईमुळे पंजाब प्रांतात खलिस्तानवादी चळवळ थंडावून हिंसाचार कमी झाला व राज्यात शांतता प्रस्थापित झाली.

() जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.

उत्तर :

  • संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. या दुरभिमानातून भिन्न धर्मीयांचा एकमेकांवरील विश्वास उडतो.
  • हा विश्वास उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो. समाजातील शांतता धोक्यात येते.
  • धर्माच्या नावाने दंगली होऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवित यांची हानी होते.
  • व्यापक राष्ट्रहिताचा विसर पडून फुटीरता निर्माण होते. या दुहीचा आणि अशांततेचा फायदा शत्रुराष्ट्रे घेतात; म्हणून जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.

प्रश्न . पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा.

() MNF

उत्तर :

MNF : मिझो नॅशनल फ्रंट.

() NNC

उत्तर :

NNC : नागा नॅशनल कौन्सिल.

() PLGA

उत्तर :

PLGA: पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी.

PDF of this Chapter

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने - नोट्स

PDF : इयत्ता नववी- इतिहास-पाठ-३ : भारतापुढील अंतर्गत आव्हाने - स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता नववी- इतिहास व राज्यशास्त्र -Marathi Medium  - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : धडा २ : भारत : १९६० नंतरच्या घडामोडी - online solutions

Next Chapter : धडा ४ : आर्थिक विकास - online solutions

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *